Friday 24 March 2017

१८ वा - वधु - वर परिचय मेळावा कार्यक्रम - रविवार दि. २६/३/२०१७

कार्तिकस्वामी आदिवासी बहुद्देशीय मंडळ म्हसरुळ (नाशिक)

१८ वा - वधु - वर परिचय मेळावा कार्यक्रम 
कार्यक्रम - रविवार दि. २६/३/२०१७. 

स्थळ - श्री . नाथ कृपा लॉन्स, आरोग्य विज्ञान विध्यापिठाजवळ , दिंडोरी रोड म्हसरूळ, नाशिक -४


Tuesday 12 April 2016

 Krantiveer  Bhagoji Naik भागोजी नाईक

नाशिक व नगर जिल्ह्यात आदिवासी समाजाच्या वतीने
राघोजी भांगरे यांनी ब्रिटिशांविरुद्ध पहिला उठाव केला.
शेतकर्यांकडून इंग्रज त्याकाळी शेतसारा वसूल करीत असत.
त्यामुळे आदिवासी बांधव सरकारविरुद्ध नेहमी बंड करीत.
याच काळात इंग्रजांनी आदिवासी समाजाचील
युवकांची पोलीस दलात भरती सुरु केली. सिन्नर
तालुक्यातील नांदूरशिंगोटे भागोजी नाईकही पोलीस दलात
भरती झाला.
१८५७ च्या काळात भारतभर इंग्रजांविरुद्ध उठाव झाले.
भागोजी पोलीस दलात असल्याने आपल्याच
बांधवांच्या विरुद्ध लढा द्यायचा, याबद्दल त्याला खेद
वाटत होता. याच काळात अकोले, संगमनेर, सिनार, कोपरगाव,
निफाड, पेठ या भागातील महादेव कोळी व भिल्ल
बंडखोरांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केला.
भागोजींनीही याचवेळी बंडाचा पवित्रा घेऊन नांदूरशिंगोटे-चास
दरम्यान असलेल्या खिंडीत पन्नास जणांची तुकडी तैनात
करुन त्यांना मार्गदर्शन केले.
भागोजींनी ब्रिटीशांना ’सळो की पळो’ करुन सोडले. चास
खिंडीत जेम्स हेन्री याच्या नेतृत्वाखालील सैन्यात व
भागोजी नाईक यांच्यात जोरदार लढाई झाली. या लढाईत ४
Oct १८५१ रोजी ब्रिटीश अधिकारी हेन्री मारला गेला.
त्यानंतर इंग्रज सरकार भागोजी नाईकच्या मागावर होते.
सिन्नर तालुक्यातील सांगवी, मिठसागरे, पंचाळे या भागात
इंग्रजांविरुद्ध भागोजीची शेवटची लढाई झाली. ११ Nov
१८५१ रोजी झालेल्या लढाईत फितुरीमुळे भागोजीला वीरमरण
आले. तसेच त्यांच्याबरोबर असलेले ५० पैकी ४८
क्रांतिकारक मारले गेले. भागोजी व त्यांचे क्रांतिकारक
सहकारी त्याकाळी शरण न जाता सारखे लढत राहिले.
नांदूरशिंगोटे येथे सुरु झालेले क्रांतियुद्ध सांगवी येथे संपले.



Bhagoji Naik, 1857-1859: During the 1857 risings Ahmadnagar was the scene of considerable disturbance. The rebels were about 7,000 Bhils of south Nasik and north Ahmadnagar. Detachments of troops were stationed to guard the frontier against raids from the Nizam's dominions, and to save the large towns from the chance of Bhil-attacks. The work of scattering the Bhil gatherings and hunting the rebels was left almost entirely to the police who were strengthened by the raising of a special Koli corps and by detachments of infantry and cavalry. The first gathering of Bhils was under the leadership of one Bhagoji Naik. This chief, who had been an officer in the Ahmadnagar police, in 1855 was convicted of rioting and obstructing the police and was sentenced to imprisonment. On his release he was required to find security for his good behaviour for a year. Shortly after the year was over, in consequence of the order for a general disarming, Bhagoji left his village of Nandur-Shingote in the Sinnar sub-division of Nasik, about five miles to the north of the Ahmadnagar boundary. Being a man of influence he was soon joined by some fifty of his tribe and took a position about a mile from his village. commanding the Pune-Nasik road. [Bhil women joined the party. The Commissioner of Police later reports to the Secret Department, Bombay, in his despatch of June 1st, 1858, " Bheel women are just as troublesome and mischievous as the men...... They obtain information and supply it for the males, cook their food, and fight also. They should be retained as hostages and not released till Bhagoji and other Naiks are captured.". (Source material for the History of Freedom Movement in India, Vol. I, p. 307).] After a few days (4th October 1857) Lieutenant J. W. Henry, the Superintendent of Police, arrived at Nandur-Shingote and was joined by his assistant Lieutenant, afterwards Colonel, T. Thatcher, and Mr. A. L. Taylor, inspecting postmaster. The police force under Lieutenant Henry consisted of thirty constables and twenty revenue messengers armed with swords. Lieutenant Henry told the mamlatdars of Sangamner and Sinnar to send for Bhagoji and induce him to submit. Bhagoji refused unless he received two years' back-pay and unless some arrangement was made for his maintenance. On receiving this message, the police were ordered to advance against his position. The first shot killed a man immediately behind Lieutenant Henry. The officers dismounted, but before they had advanced many yards were met by a volley, and Lieutenant Henry fell wounded. He regained his feet, and pressing on, received a mortal wound in the chest. The attack was continued under Lieutenant Thatcher and the Bhils retreated. This engagement excited the whole Bhil population. A fresh gang of about 100 Bhils was raised by Patharji Naik in the Rahuri sub-division. Dadoba Pandurang Tarkhadkar who was then the Huzur Deputy Collector of Ahmadnagar proceeded to the place of disturbance and courageously met the Bhils asking them to surrender. The Bhil leaders were so impressed by his confident behaviour that they submitted [A. K. Priolkar Biography of Dadoba Pandurang, p. 224.] and for a time dispersed only to meet again and follow their routine. Their gang was soon dispersed by Major, later Lieutenant, General Montgomery, the new superintendent of police. On the 18th October, an engagement took place in the hills of Shamsherpur in Akola, between Bhagoji's men and a detachment of troops and police under Colonel Machan of the 26th Native Infantry in which Lieutenant Graham who was on special police duty and Mr. F. S. Chapman of the civil service who accompanied the force were wounded. As disorder was wide-spread, Captain, later General, Nuttall, who succeeded Lieutenant Graham, was ordered to raise a corps of Kolis, the hereditary rivals of the Bhils, who in Maratha times, had been among the bravest of the Mavlis or West Deccan footmen. The corps was recruited chiefly in the hilly parts of Akola, of Junnar in Pune, and of Nasik. In December 1857 a hundred men armed with their own swords and muskets were fit for the field, and so useful did they prove, that in January and February 1858 a second levy of 110 was ordered, and shortly after the strength of the corps was increased to 600 men with a commandant and adjutant.

In raising the corps Captain Nuttall dealt with the heads of the different clans, promising them rank and position corresponding to the number of recruits they brought to the corps. Javji Naik Bomla, the chief of the Bomla clan, was made the head of the corps and a brother of the famous outlaw Raghoji Bhangre and other leading men were chosen as officers. Drill masters were lent by the Ahmadnagar police, and inspite of the want of leisure, the Kolis mastered their drill with the ease of born soldiers, and proved skilful skirmishers among hills and in rough ground. In 1858 the rebels were chiefly engaged in Nasik, Khandesh, and the Nizam's dominions and gave no trouble in Ahmadnagar. In the hot weather (April-May) of 1859 the Bhils under Bhagoji and Harji Naiks again appeared in the district. On the 5th of July after a forced march, Captain Nuttall came upon the Bhils near Ambhora Dara eight miles south-east of Sangamner. The Bhils took a strong position from which they were driven by twenty-five men of the Koli corps with a loss of ten killed, including Yashvant Bhagoji's son, several wounded, and three prisoners among whom was Harji Naik, one of the leaders. In October 1859 parties of Bhils were reported to be gathering in the Nizam's territory with the intention of joining Bhagoji. In the British districts also they were again becoming uneasy and excited. Under these circumstances, a detachment of Native Infantry was kept posted along the frontier which was constantly patrolled by strong parties of the Pune Irregular Horse. On the 26th of October, Bhagoji plundered the village of Korhala in Kopargaon and carried off property worth about Rs. 18,000. He was closely pursued by Captain Nuttall for nearly a fortnight along the rough Sahyadri country, down to the Konkan, and up again into Ahmadnagar, but by very rapid and secret marches always succeeded in baulking his pursuers. At last on the 11th of November, the rebels were pursued by Mr., later Sir, Frank Souter, the newly-appointed police superintendent of the district, and at Mithsagar, in the Sinnar subdivision of Nasik, in a hand-to-hand fight Bhagoji and most of his followers were killed and the rebellion brought to an end. The Nizam Bhils who were awaiting Bhagoji's arrival dispersed, and on the 20th in falling back from the British frontier with a loss of forty killed were attacked and routed by a detachment of the Hyderabad contingent under Lieutenant Pedler. On the 12th of November a large party of Bhils, under an influential chief, a relative of Bhagoji's, left Sonai in Nevasa to join Bhagoji. On hearing of his death they turned towards Khandesh where they were caught. As they had committed no crimes they were pardoned and allowed to return to their homes. Though disturbances were at an end posts of regular troops were maintained till 1860. When the regular troops were withdrawn their places were taken by detachments of the Koli corps. The Koli corps continued to perform this out-post duty till March 1861, when they were disbanded, and all, except a few who entered the police, returned to their former life of tillage and field labour. The strategy of raising the Kolis against Bhils was eminently successful. Instead of heading disturbances, as had often happened since, the disciplined Kolis were a powerful element in repressing disorder. Under Captain Nuttall's patient and kindly care, and by the example of his dashing bravery and untiring energy, they proved a most orderly, well-disciplined, active, and courageous force. They showed themselves superior to the Bhils in strength and spirit, and in their two and a half years of active service five times earned the special thanks of Government. [Recently in 1962, an autobiographical account (Atmahakikat) of Pandurang Mahipat Belsare of Pathardi has been brought to light by the Archives Department of the Government of Maharashtra wherein, Belsare gives an account as to how he had served in the regiment of Tatya Tope from 8th October to 27th October, 1858, but subsequently escaped and fled to Gwalior.]

In 1873, one Honya Bhagoji Kengle, an influential Koli of Jamburi in Pune, at the head of a well-trained gang, began a series of attacks on the money-lenders who habitually cheat and oppress the hill-tribes and at intervals drive them into crime. Honya's robberies extended over the western parts of Pune, Ahmadnagar and Nasik and the eastern sub-divisions of Thana. They became so numerous and daring that in 1874 a special police party of 175 armed men under Colonel Scott and Mr. W. F. Sinclair C. S. was detached for his arrest and proclamations were issued offering rewards of Rs. 1,000 for Honya and Rs. 200 to Rs. 600 for any of his followers. Inspite of these measures Honya managed to evade pursuit till July 1876 when he was caught by Major H. Daniell, then superintendent of police. In 1875 the spirit of disorder spread from the Kolis to the peace-loving Kunbis of the plain country and between May and July chiefly in Parner, Shrigonda, Nagar and Karjat. Twenty-two cases of assaults on money-lenders by bands of villagers were committed. Troops were called to the aid of the police and the disturbance was put down. The rising of Kolis in the seventy's of the 19th century were not so much a revolt against the established British authority as they were the outcome of extreme famine conditions then prevailing in the Deccan, when it is on record that people suffered from deaths due to starvation. While peasants suffered from extreme want and poverty, the money-lenders were keen on demanding their Shylock's pound of flesh, through the law courts established by the British. That is why they were the victims of the fury of famine-stricken people.

Source for information in english: http://ahmednagar.gov.in/gazetteer/his_modern_period.html

Monday 11 April 2016

Baburao Puleshwar Shedmake क्रांतिवीर बाबुराव शेडमाके

 21 अक्टुबर 1858 बलिदान दिवस



 "आझाद भारत की लढाई मे आदिवासीयो का अहम हिस्सा रहा है ! अंग्रेजो के खिलाफ इन्होने काफी समय पहले से आवाज उठाई है , पर अफसोस के इनका इतिहास कभी दुनिया के सामने नही आ पाया ! " हाँ, दोस्तो ऐसे ही महान क्रांतिकारीयो मे से एक आदिवासी गौंडवाना समाज के विर बाबुराव पुलेश्वर शेडमाके , जिन्होने अंग्रेजो का जिना हराम करके रख दिया था ! इन्होने अपनी संघटना स्थापीत कर लोगो को एक किया और ब्रिटिश काफिलो पे हमले सुरु कर दिये ! आज भी गौंडवाना का इतिहास गवाह है, चंद्रपुर शहर के घोसरी गाव के पास हुये युद्ध मे बडी मात्रा मे अंग्रेज मारे गये थे और विर बाबुराव शेडमाकेजी का विजय हुआ था ! पर छल कपट से विर बाबुराव शेडमाकेजी को पकडके अंग्रेजो ने 21 अक्टुबर 1858 को चंद्रपुर (महाराष्ट्र)मे गौंड राजा की राजधानी मे फासी पे लटकाया और एक महान क्रांतिकारी का अंत हो गया !
 विर बाबुराव शेडमाकेजी के याद मे आज भी चंद्रपुर के जिला कारागुह मे हजारो आदिवासी बंधु मिलके हर साल  21 अक्टुबर को उनका बलिदान दिवस मनाते है !


British Empire, began establishing themselves as administrative rulers from traders. In the Mughal courts of India, they started trade by asking Emperor Jahangir for permission to do business through Gujrat’s Porbandar and Surat. Emperor Jahangir was much delighted to get England’s fine wine, diamonds, fine gems etc. and Britishers got permission. In the sixteenth century, British East India Company was spreading western trade throughout in different states. Since the sixteenth century, the southern and eastern states like East Bengal, Madras, Cochin, Travancore, became ports for the ships coming from England. Gondwana region at the centre was rich and prosperous. Thus many kingdoms were eyeing on it. Mughal Empire in the north, Vijaynagaram and Bahmani in south and Sultan of Bengal, wanted to get hold of Gondwana’s Devgarh and Garha Mandala, Kherla and Chanadagarh. There were frequent attacks in Gondwana from Marathas of Satara, with the help of Rajputs and Nizam of Bengal.

Incidentally, East India Company had managed to get a grip over the native state governments and they were brought under British rule. East India Company established its center at Madras and then Kolkata, and thereafter intended to rule by creating anonymity between different states. After the battle of Plassey in 1771 AD, East India Company was scrapped and British government took control and began operating it directly from England. British government opened a foreign ministry for India, and British rule began with their control over more than half of imperial princely states. British used to invade Gondwana from north by putting Marathas in front. Bahamani of Pune, Satara and Marathas together with the help of Britishers and South Marathas, they attacked, destroyed and occupied many fortresses in Gondwana kingdoms.

Europe required raw materials for industrial development, for the new factories in England. And India was what could provide them with, timber, bamboo, minerals, cotton etc. Their eyes fell on Indigenous people of Bihar and people came out and rebelled against the British. Tilka Majhi was the first aboriginal warrior who gave slogan “Foreigner Britishers, Quit India” and attacked British cantonments using bow arrow ax.


Gondwana’s 52 fortresses were captured by Marathas. They had annexed Devgarh and Chanda Garh as well. By 1751 entire Gondwana was taken over by Marathas. They robbed Gondwana like never before, even during Mughal period. Gondwana’s culture, language and religion were destroyed and Sanskrit was imposed in two districts Satara and Rantagiri. In place of Gondi language and script, Marathi was promoted in each and every village by Brahmins from Pune. Bhopal was under rile of Afghan Muslims. Holkars of Indore, Sindhiyas of Gwalior, Marathas and Bhonsles of Nagpur along with British managed to take over Gondwana. Maratha’s tyranny was such that British had to take control and by 1853 British Empire was established. In retaliation, Kings of Gondwana, Shankarshah, Raghunathshah, Devnarayan Singh and landlord of Chanda Puleshwar’s son Baburao came together and started organizing people’s army against British. Landlord of Ahiti Ghontm Vir Baburao began gathering young soldiers from village to village.

Baburao Puleshwar Shedmake was born on 12th March, 1833. He was the eldest son of Poolaisur Bapu and Jurja Kunwar. Poolaisur Bapu was Up Zamindar of Molampalli of Ghot Zamindari under District Chanda OP and Berar, Maharashtra. As per the tradition of Gond tribe, Shedmake got his initial education from Ghotul Sanskar Kendra where he learnt Hindi, Gondi and Telugu along with music and dance. English was getting prominence Shedmake’s father sent him to Raipur, Chhatisgarh for learning English. After completing his education at Raipur, Shedmake came back to Molampalli. He was 18 years old when he as per his tribe tradition got married to Raj Kunwar.

In 1854 Chandrapur came under British rule. Shedmake was first to raise his voice against British rule. He used Guerilla war tactics against the Britishers. During 1857, when entire India declared war of independence against the British rule, Shedmake consolidated 500 tribal youth from the region and prepared an army and with this army he was able to capture Rajghad area. When this information reached Chandrapur, the Deputy Collector, Mr.Krikton sent British army to curb it, but near Nandgaon Ghosari the British army was defeated. Mr.Krikton sent another troop which fought battle at Sanganapur and Bamanpet but they also lost the battle.


These two victories encouraged Shedmake and he attacked telephone camp at Chinchgudi on 29th April, 1858 in which Telegraph Operators Mr.Hall and Mr.Gartland were killed but Mr.Peter managed to escape and reported the incident to Mr.Krikton. Mr.Krikton then used his diplomatic tactics for arresting Shedmake. On one side he asked Captain Shakespeare from Nagpur to assist him and on the other side he forced Rani Laxmi Bai, Zamindarini of Aheri to help them. His tactics worked and Rani Laxmi Bai conspired against  Shedmake which he was not aware of. On 18th September, 1858 Shedmake was arrested. He was brought to Chanda Central Jail. On 21st October, 1858 Baburao Puleshwar Shedmake was hanged at open ground in Chanda.

Baburao Shedmake remains an icon of bravery and leader of his tribe, who did everything to protect his homeland from outsiders. 12th March is celebrated as Birth Anniversary of Vir Baburao Shedmake throughout Gondwana region, and especially in Chandrapur. On his memory, a commemorative stamp was issued by India Post on 12th March 2009.

References:

Translated and edited in English from Gondwana Darshan, Year 29, Volume-10, October 2014, originally written by Sunher Singh Taram.
Rana Punja Bhil - राणा पूंजा भील






इतिहास में उल्लेख है कि राणा पूंजा भील का जन्म मेरपुर के मुखिया दूदा होलंकी के परिवार में हुआ था। उनकी माता का नाम केहरी बाई था, उनके पिता का देहांत होने के पश्चात 15 वर्ष की अल्पायु में उन्हें मेरपुर का मुखिया बना दिया गया। यह उनकी योग्यता की पहली परीक्षा थी, इस परीक्षा में उत्तीर्ण होकर वे जल्दी ही ‘भोमट के राजा’ बन गए। अपनी संगठन शक्ति और जनता के प्रति प्यार-दुलार के चलते वे वीर भील नायक बन गए, उनकी ख्याति संपूर्ण मेवाड़ में फैल गई। इस दौरान 1576 ई. में मेवाड़ में मुगलों का संकट उभरा। इस संकट के काल में महाराणा प्रताप ने भील राणा पूंजा का सहयोग मांगा। ऐसे समय में भील मां के वीर पुत्र राणा पंूजा ने मुगलों से मुकाबला करने के लिए मेवाड़ के साथ अपने दल के साथ खड़े रहने का निर्णय किया। महाराणा को वचन दिया कि राणा पूंजा और मेवाड़ के सभी भील भाई मेवाड़ की रक्षा करने को तत्पर है। इस घोषणा के लिए महाराणा ने पूंजा भील को गले लगाया और अपना भाई कहा। 1576 ई. के हल्दीघाटी युद्ध में पुंजा जा भील ने अपनी सारी ताकत देश की रक्षा के लिए झोंक दी। हल्दीघाटी के युद्ध के अनिर्णित रहने में गुरिल्ला युद्ध प्रणाली का ही करिश्मा था जिसे पूंजा भील के नेतृत्व में काम में लिया गया। इस युद्ध के बाद कई वर्षों तक मुगलों के आक्रमण को विफल करने में भीलों की शक्ति का अविस्मरणीय योगदान रहा है तथा उनके वंश में जन्मे वीर नायक पूंजा भील के इस युगों-युगों तक याद रखने योग्य शौर्य के संदर्भ में ही मेवाड़ के राजचिन्ह में एक ओर राजपूत तथा एक दूसरी तरफ भील प्रतीक अपनाया गया है। यही नहीं इस भील वंशज सरदार की उपलब्धियों और योगदान की प्रमाणिकता के रहने उन्हें ‘राणा’ की पदवी महाराणा द्वारा दी गई। अब हमारा राजा पूंजा भील ‘राणा पूंजा भील’ कहलाकर जाने लगे।

The Great Rana Punja Bhil and his Garasia Army.
सायद आपने 300 movie देखि हो। उसमे जो Spartons की सेना थी वेसी खूंखार, दमदार और जाबांज़ सेना आपको लगता होगा की सिर्फ Hollywood की फ़िल्म में ही हो सकती हे। पर सायद आपको ये नहीं मालुम होगा की ऐसी ही सेना आजसे 500 साल पहले हलदिगाती की लड़ाई में मौजूद थी। जी हां राणा पूंजा के नेतृत्व में लड़ने वाली सेना गरासिया।
16वि सताब्दी में जब महाराणा प्रताप का राज्य मेवार मुग़ल सेना के आक्रमणों की वजह से पूरा खत्म हो चूका था। तब महाराणा प्रताप अरवल्ली के जंगल में जाके इस भूमि पर बसने वाले सबसे वीर योद्धा के कबिले के पास मदद के लिए जा पहोंचे।
अब ये गरासिया कोण हे कहा से थे ये भी इतिहासकारो ने अलग अलग theory दी हे। कुछ कहते हे की ये आदिवासी थे जो की अरावली के जंगल में बस्ते और कुछ कहते हे की ये वो लोग थे जो की अपनी भूमि से बेहद प्यार करते और राजा और उनकी आर्मी को ट्रेन करते। उदय सिंह, महाराणा प्रताप और अमर सिंह का राजतिलक भी इन गरासिया के लोगों के खून से होता।
अब जब 1576 में फिरसे हलदिगाती की लड़ाई होने वाली थी तब महाराणा प्रताप को सिर्फ इस राणा पुंजा की भील गरासिया सेना का ही सहारा था। सिर्फ 9000 की इस सेना के सामने 86000 मुग़ल की फ़ौज थी।मुकाबला एक के सामने 9 का था। ये मुग़ल की फ़ौज 5 टुकड़ी में बटी हुई थी। साथ में इन मुग़ल के पास हाथी, गोड़े और तोफ भी बहुत थी। पर सामने गरासिया की सेना के पास सिर्फ भाले, तलवार और तीर कमान के अलावा कुछ भी नही था। पर जब युद्ध हुआ और सबसे भयानक और खूंखाए लड़ाई में जांबाज़ और खूंखार इन आज के आदिवासी गरासिया आर्मी ने लोगो 86000 में से सिर्फ 12000 मुग़ल को जिन्दा रहने दिया और मुग़ल की पांच टुकड़ी में से सिर्फ सैयद हासिम बारराह और माधो सिंह की टुकड़ी ही बच पायी क्योंकि उन्होंने सामने से गुटने टेक दिए। ये अकबर की सबसे बड़ी और ज़िल्लत भरी हार थी।
ये हार जो थी वो अकबर को बोहत चुभी इसीलिए अकबर ने अरवल्ली के नज़दीक ही छुप कर हमला कर लिया। तब सिर्फ महाराणा प्रताप की जान और अपने घर और पवत्रि जंगल को तबाह होने से बचाने के लिए गरासिया ओ ने खुद अपनी जान दाव पर लगादी पर महाराणा प्रताप और अरवल्ली की गिरीमाला को एक खरोच तक नहीं आने दी। पुंजा भील ने स्वयं महाराणा का कवच और मुकुट पहनके मुग़ल सेना को चकमा दिया और महाराणा प्रताप को सही सलामत अरवल्ली के जंगल बिच मेहफ़ूज़ जगह पर ले गए। इस बहादुरी और सहाशिक कार्य और गरासिया की वीरता को देख महाराणा प्रताप ने पुंज भील को राणा का ख़िताब दिया जो की राजपुताना भूमि पे महाराणा के बाद दूसरा सबसे बड़ा सामान होता हे।
महाराणा प्रताप के मारने के बाद स्वयं राणा पुंजा भील ने महाराणा के पुत्र अमर सिंह को तैयार किया और 17 साल की उम्र में अपने खून से उसका राजतिलक करके आधे मेवार को वापस जीत लिया। राणा पुंजा भील इतिहास के सबसे महान सेनापत्ति थे। आज भी उदैपुर में लोगो और स्मारक में एक तरफ महाराणा प्रताप होते हे तो दूसरी तरफ राणा पूंजा। आज भी स्मारक में आगे राजपूत तलवार लिए होते हे तो दूसरी तरफ आदिवासी गरासिया तीर कमान लिए। आज राणा पूंजा भील और गरासिया सेना के वंसज डूंगरपुर, बांसवारा, पाली और गुजरात के साबरकांठा और अरवल्ली में बस्ते हे। पर आज इन आदिवासी गरासिया की महानता और वीरता को किसी ने भी नहीं सराहा। सायद इसीलिए आदिवासी हमेसा निस्वार्थ भाव से अपनी भूमि और वन की रक्षा करता हे क्योंकि वो पैसे और जागीर के नहीं लालची नहीं हे।



Punja Bhil or Punja bheel was born in the family of Dunha Holika at village Merpur. After the demise of his father he was made head of the village at the age of 15 years. Later he became the king of King of Bhomat in Mewar region (Rajasthan). In 1576 Maharana Pratap of Udaipur sought the help of Punja Bhil in his fight with Akbar. Punja Bhil agreed [1] to save Mewar Region from the Moguls.  Punja Bhil and his men used Gurilla-Techniques of War of Haldi Ghati where Punja Bhil fought side by side with Maharana Pratap against Mogul Army. The title Rana was conferred on Punja bhil by the Rajputs of Mewar. The participation of Bhils in the war is acknowledged [2] by  royal emblem of Mewar State which carries a Victory Tower that is flanked by a Rajput warrior on one side and “ a bow –arrow-bearing Bhil”, on the other. Even after the battle of Haldi Ghati, Rana Punja and his tribesman came forward [3] time and time again, to fight for the freedom of Mewar. The Bhils are also represented on the Mewar Coat of Arms, standing side by side. During the coronation [3] ceremony a Bhil tribesman must honour the new Maharana with a tilak (marking on the forehead) of his own blood. It is only then that the new Maharana will be universally recognized as successor.

Please note this information gather from Internet

Sunday 10 April 2016

महात्मा जोतिबा फुले


महात्मा जोतिबा फुले  (जोतिबा गोविंदराव गोऱ्हे ) यांच्या १८९ जयंती निमित्त विनम्र अभिवादन

जन्म : ११ एप्रिल १८२७ - मृत्यू : २८ नोव्हेंबर १८९०


जोतीराव गोविंदराव फुले

महात्मा जोतीबा फुले (एप्रिल ११, इ.स. १८२७ – नोव्हेंबर २८, इ.स. १८९०) हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन पुरोगामी विचारांची मांडणी केली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणास प्रोत्साहन देऊन मुहुर्तमेढ रोवली. त्यांनी भारतातील मुलींची पहिली शाळा १८४८ साली पुणे येथे भिडेंच्या वाड्यात उघडली. आपल्या पुरोगामी विचारांची निर्भयपणे मांडणी केली व स्वत:चे विचार आचरणात आणले. महात्मा जोतिबा फुले हे मराठी, भारतीय समाजसुधारक होते. डॉ. आंबेडकर हे जोतिबांना आपले गुरु मानत. गांधीजींनी ‘खरा महात्मा’ म्हणून त्यांचा गौरव केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांना ‘सामाजिक क्रांतिकारक’ म्हणत. दलितांसाठी आणि मुलींसाठी शाळा काढण्याच्या आपल्या हेतूच्या सिद्धीसाठी त्यांना घर सोडावे लागले. गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसुड, इशारा, सत्सार अंक १ आणि २, सार्वजनिक सत्यधर्म ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.

बालपण आणि शिक्षण:-
जोतीबा फुले यांचे मूळ गाव – कटगुण (सातारा) होते. गोऱ्हे हे त्यांचे मूळ आडनाव. कटगुणहून त्यांचा परिवार पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आला.. तेथे त्यांचे घर असून, त्यांच्या नावे सातबाराचा उतारा आहे. खानवडी येथे फुले व होले आडनावाची बरीच कुटुंबे आहेत. जोतीबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. महात्मा फुल्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी ११ एप्रिल १८२७ साली झाला. वडिलांचा फुले विक्रीचा व्यवसाय त्यामुळे फुले म्हणून ते ओळखण्यात येऊ लागले. व तेच नाव पुढे रूढ झाले.प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. १८४२ ला माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला.

सामाजिक कार्य:-
सप्टेंबर २३, इ.स. १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. पुरोहितांकडून होणाऱ्या अन्यायापासून, अत्याचारापासून व गुलामगिरीतून तथाकथित शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.” ‘सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥’ ” हे समाजाचे घोष वाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.
जोतीरावांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत. वाचनाची अतिशय आवड असल्यामुळे शिवाजी महाराजांचे चरित्र व थॉमस पेन या विचारवंताच्या ‘राईटस् ऑफ मॅन’ या ग्रंथाचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला. ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा त्यांनी निश्चय केला. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून ते अतिशय अस्वस्थ होत असत. त्याप्रमाणे आपल्या पत्नी सावित्रीबाईंना त्यांनी साक्षर केले. १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी पुण्याच्या वेताळपेठेत १८५२ मध्ये त्यांनी शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण जोतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत. समाज सुधारण्याच्या कार्याला गती देण्यासाठी व व्यापक करण्यासाठी १८७३ साली त्यांनी ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली. ‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’ असे रोखठोकपणे बोलताना मात्र या विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी शक्ती आहे अशी त्यांची (अस्तिक्यवादी) विचारसरणी होती.‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’ हा विचार मांडणारे जोतीराव एक तत्वचितक व्यत्तिमत्त्व म्हणूनही आपल्यासमोर येतात.

शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या त्यांच्या कवितेच्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत. –

“विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।
नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।। “

रूढीवर टीका : –
समाजाच्या आरोग्यासाठी फुल्यांसारखी सामाजिक अन्याय व दु:खे यांच्यावर बोट ठेवणारी नि त्यासाठी समाजाला धारेवर धरणारी माणसे हवीत, असे आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा त्याचवेळी ही माणसे प्रचलित धर्मसंस्थेवर, धार्मिक समजुतींवर, आचार धर्मावर कठोर प्रहार करणार आहेत, हेही मान्य करावे लागते. धर्मावरची त्यांची टीका अपरिहार्य असते. कारण धार्मिक समजुतींच्या बैठकीवरच सगळ्या जुन्या समाजांचा बराचसा कारभार चाललेला असतो. रिच्युअल्स ऊर्फ विधिजाल आणि देवादिकांबद्दलची मिथ्थके यांच्या मदतीनेच धर्म हे माणसांचे आपसाआपसांतले व्यवहार नियंत्रिक करीत असतात. काही प्रमाणात प्रजेला दिल्या गेलेल्या प्रत्यक्ष आदेशाच्या रुपात, तर ब-याच प्रमाणात प्रेरक स्वरुपाच्या सूचनांच्या स्वरुपात हे सर्व घडत असते.

विधिकल्प व मिथ्थके : –
जेव्हा कधी अगदी पूर्वकाळी या कथा वगैरे रचल्या जातात, तेव्हा त्यांचा उद्देश त्या घटितात (सिच्युएशन) किंवा मानवी प्रसंगामध्ये मानवाला कसे वागायचे हे शिकवावे हा असला, तरी कालांतराने त्या रुढींचे व कथांचे कठीणसे घट्ट साचे बनतात नि ते जनतेची हालचाल, चलनवलन वगैरे मर्यादितही करुन टाकतात. हे कसे घडले हे दाखविण्यासाठी अशा कथांचे एक उदाहरणच देते. हे उदाहरण साध्या लोककथेचे आहे. मूळ किंवा आदिम प्राक-कथनातला धर्मवाचक आशय जेव्हा कमकुवत होतो, तेव्हा त्या प्राक-कथांचे रुपांतर लोककथांमध्ये होत असते. नवरा-बायकोच्या जोडीत नव-याने पुरुषाची कामे करावीत नि बायकोने बाई माणसाची करावीत, हा धडा किंवा पाठ देणा-या कथा या सर्व जगभर प्रचलित आहेत. एका कथेत बायको शेतात जाऊन पुरुषाचे काम करु पाहते, तर नवरा घरात राहून रांधणे – वाढणे, धुणी – भांडी, मुले सांभाळणे हे बायकोचे काम करतो, तेव्हा त्यातून अनेक गमती-जमती आणि घोटाळे कसे होतात, त्याचे वर्णन येते. या कथेतील गमती – जमतीचा किंवा विनोदाचा भाग बाजूला सारला, तरी पुरुषांनी पुरुषांची नि बायकांनी बायकांची कामे केली, तरच संसार व्यवस्थित चालू शकतो, हा ’जैसे थे’ चा पुरस्कार करणार किंवा गतानुगतिकाचा गर्भित संदेश प्रतीत होतोच. समाजाच्या आरोग्यासाठी फुल्यांसारखे आवश्यक आहेत, असे जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा ते आपल्या धार्मिक समजुतींवर आघात करतात, हेही आपल्याला नुसते गृहित धरुन चालत नाही तर कबूल करावे लागते.

अश्वमेधाचा घोडा : –
वाजसनेयी संहितेत अश्वमेध यज्ञाच्या वेळी होता आणि राजाची मुख्य महिषी यांच्या संवादाचे अनेकदा भांडवल केले जाते. हे संवाद अश्लील आहेत (अर्थात , आजच्या आमच्या दृष्टीने अश्लील. त्या काळातल्या लोकांच्या तर्फे नव्हेत.) .यात शंका नाही. परंतु शीर तुटलेल्या घोड्याच्या बाजूला राणी झोपते वगैरे सगळा जो पुजाविधी आहे त्याचे त्या काळाच्या दृष्टीने बरेच मोठे कार्य आहे. असाच विधी आयर्लंडमध्ये केला जात असे. मूळ स्वरूपात ही एक इंडो – युरोपियन मिथ्यकथा आहे. भारतीय , आयरिश , ग्रीक , रोमन , रशियन , वेल्श या सगळ्या लोकांमध्ये या ना त्या स्वरूपात ही मिथ्यकथा आढळते. अश्वमेधातला घोडा हे सूर्यदेवाचे प्रतिक आहे आणि म्हणूनच राजाचा ‘ अल्टर इगो ’ म्हणजे दुसरा आत्मा आहे. घोड्याचे डोके तोडणे म्हणजे घोड्याला खच्ची करणे. राणी घोड्याचे किंवा सूर्यदेवाचे पुरूषत्व त्याच्यापासून हिरावून घेते आणि आपल्या पतीला म्हणजेच राजाला बहाल करते. राजा हा परत विष्णूचा अवतार आहे. पृथ्वी ही त्याची पत्नी आहे. सूर्यापासून बीज घेऊन राजा पृथ्वीला सुफलित करतो असा एकुण मतितार्थ आहे. त्याकाळी अश्वमेध यज्ञ करणे हे राजाचे एक कर्तव्य होते. लोक त्याला तसे करायला भाग पाडीत असत.

फुले महात्माच : –

वरील विवेचनावरून कुणी असा ग्रह करून घेऊ नये की , मी महात्मा फुल्यांना कमी लेखते आहे ; किंवा कुणी असेही समजू नये की , मी जुन्या जमान्याचा , जुन्या वैचारिक मूल्यांचा व समाजपद्धतीचा पुरस्कार करते आहे. तसे अजिबात नाही. महात्मा फुले हे खरोखरच महात्मा होते. कामगारांची दयनीय स्थिती पाहून त्या स्थितीचे विश्लेषण करणारे , ‘ द कंडिशन ऑफ द वर्किंग क्लास इन इंग्लंड ’ हे पुस्तक एंगल्सने सन १८४४ मध्ये लिहिले. महात्मा फुल्यांनी येथल्या शेतक-याची दयनीय अवस्था पाहून साधारण १८८० वगैरेच्या दरम्यान ‘ शेतक-याचा आसूड ’ हे पुस्तक लिहिले. त्यांच्या काळात अन्य कुणाला शेतक-यांच्या हाल अपेष्टांवर पुस्तक लिहिणे सुचू नये , यातच फुल्यांचा मोठेपणा स्पष्ट होतो. त्यांनी स्त्रियांसाठी , अस्पृश्यांच्या मुलांसाठी शाळा काढल्या. बालहत्या प्रतिबंधकगृहाची स्थापना केली. आणि इतरही अनेक परोपकाराची नि लोकहिताची कामे केली. ती केली नसती तरी ‘ शेतक-याचा आसूड ’ या एकाच पुस्तकानेही त्यांचे मोठेपण सिद्ध झाले असते.

जोतीरावांची सत्यशोधक चळवळ :-

सामाजिक समता म्हणजे ब्राह्मणापासून अस्पृश्य समजल्या जाणा-या सर्व पुरुषांची समता असा संकुचित अर्थ जोतीरावांना अभिप्रेत नव्हता. घराबाहेर समतेचा आग्रह धरणारे पुरुष घरात समता येऊ देण्यास तयार नसतात. असे पुरुष आपल्या अनुयायांमधे दिसताच जोतीरावांनी त्यांना धारेवर धरले…. विसाव्या शतकातील महाराष्ट्राचे इतिहासकार य. दि. फडके यांनी सत्यशोधक चळवळ आणि त्यावरील महात्मा फुलेंच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव यांचा गोषवारा घेतला आहे. सत्यशोधक समाजाची स्थापन करण्यापूर्वी जवळजवळ पंचवीस वर्षे जोतीरावांनी नानाविध स्वरूपाची लोकसेवा केली होती. मुलींना आणि अस्पृश्यांना शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी पुण्यात शाळा काढल्या. तसेच विधवाविवाहात विघ्ने आणणा-या कर्मठ सनातन्यांपासून उच्चवर्णीय सुधारकांचे रक्षण केले, बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापन केली आणि एका अनाथ मुलाला स्वतःचा मुलगा मानून त्याला लहानाचा मोठा केला.
आपल्या घरचा हौद अस्पृश्य समजल्या जाणा-यांना खुला केला. ‘ सत्यदीपिका ‘ नियतकालिक चालविणारे बाबा पदमनजी यांच्यासारख्या ख्रिस्ती मिशनरी आणि ज्ञानोदयासारख्या मिशन-यांच्या मुखपत्राने जोतीरावांना नेहमी साहाय्य केले आणि त्यांची कड घेतली. त्यामुळे जोतीराव फुले हे ख्रिस्ती मिशन-यांचे हस्तक, अशी गोपाळराव आगरकरांसारख्या सुधारकाग्रणीचीही समजूत होती. जोतीरावांच्या विचारावर टॉमस पेन यांच्या धर्म व समाजविषयक विचारसरणीचा फार प्रभाव होता. जोतीरावांनी वैदिक किंवा आर्यांच्या परंपरेवर झोड उठवली. अनार्यांच्या वैदिक परंपरेपासून प्रेरणा घेतली. त्यांनी केवळ जन्माधिष्ठित जातिव्यवस्थाच नाकारली असे नव्हे तर सबंध चातुर्वर्ण्य व्यवस्थाच अन्याय्य व विषम असल्याने त्याज्य ठरवली. जोतीरावांचे एक समकालीन लोकहितवादी यांनीही पुराणातील भकडकथांची चेष्टा केली, पण वेदांविषयी त्यांना आदर होता.
याउलट श्रृतिस्मृति, शास्त्रे, पुराणे वगैरे आर्य भटांनी रचलेले भारेच्या भारे ग्रंथ म्हणजे ब्रह्मकपट आहे, असे जोतीराव म्हणत. ‘ त्रयो वेदस्य कर्तारो भंड धूर्तः निशाचराः ‘ हे बृहस्पतींचे वचन अनेकदा उद्धृत करीत. सिद्धाचार्य अश्वघोष या लेखकाने रचलेल्या वज्रसूची या ग्रंथाच्या संस्कृत बृहत्पाठाचा अनुवाद तुकोबांच्या शिष्या बहिणाबाई, शाहूकालीन कवी श्यामराज तसेच नाथलीलामृताचे कर्ते आदिनाथ गुरव यांनी केला होता. वज्रसूचीने जातिव्यवस्थेचे खंडन केले होते. त्यामुळे मध्ययुगीन मराठी संतकवींप्रमाणेच जोतीरावांनाही हा ग्रंथ प्रेरक वाटला. वज्रसूचीच्या आधारे तुकाराम तात्या पडवळ यांनी ‘ एक हिंदू ‘ या टोपण नावाने ‘ जातीभेदविवेकसार ‘ ग्रंथ प्रसिद्ध केला होता. त्याची दुसरी आवृत्ती जोतीरावांनी १८६५ साली स्वखर्चाने प्रकाशित केली होती. कबीराच्या बीजक ग्रंथातील ‘ बिप्रमती ‘ हा भाग जोतीरावांना आवडत असे. कबीराचा हा ग्रंथ त्यांनी कबीरपंथी ज्ञानगिरीबाबा यांच्याकडून समजावून घेतला होता. ख्रिस्ती धर्मोपदेशकांप्रमाणेच हे ग्रंथही जोतीरावांच्या प्रेरणेचे स्रोत होते. सत्यशोधक समाजात सभासदाला प्रवेश देताना तळी उचलावी लागत असे. तळीचे सामान म्हणून एका पिशवीत भंडारा, गुलाल, गुळाचा खडा, खोब-याच्या वाट्या, धने, विड्याची पाने, सुपारी वगैरे जिनसा ठेवलेल्या असत. तळी उचलताना खंडोबा, बहिरोबा वगैरे वीरांच्या नावे चांगभले किंवा येळकोट असा पुकारा केला जात असे. सत्यशोधक समाजाच्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे ख्रिस्ती धर्मोपदेशकांशी घनिष्ठ संबंध असले तरी त्यापैकी कोणी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्याचे आढळत नाही. सत्यशोधक समाजाची चळवळ ही मूलतः धार्मिक व सामाजिक सुधारणांचा आग्रह धरणारी चळवळ होती. सत्यशोधक समाजाच्या नियमांनुसार सभासदांना राजकीय विषयाची चर्चाही करता येत नसे. १८७७ साली समाजाने महारमांगांची दुःखे व दुष्काळ या विषयावर निबंध व वक्तृत्वस्पर्धा घेतल्या तेव्हा चिटणीस या नात्याने जोतीरावांनी स्पर्धकांना जाहीर इशारा दिला होता, ‘ या विषयावर ( म्हणजे राजकारणावर) कोणी उमेदवार लिहील किंवा बोलेल तर त्याचे भाषण लागलेच बंद केले जाईल ‘ .
न्यायी, उदार, निष्पक्षपाती इंग्रज राजवटीवरील सत्यशोधकांच्या निष्ठेमुले आणि राजकारणापासून अलिप्त राहण्याबद्दल त्यांचा कटाक्ष असल्यामुळे इंग्रजांच्या पलटणीतील सैनिकांना उद्देशून मतप्रचार करण्याची सत्यशोधकांना मुभा दिली जात असे. एवढेच नव्हे तर लष्करातील व पोलिसातील कर्मचारी सत्यशोधक समाजाचे सभासद होऊन कार्य करू लागल्यास इंग्रज सरकारने त्यांना कधी आडकाठी आणली नाही. भटभिक्षुकांच्या लबाड्या, मद्यपानाचे दुष्परिणाम, विद्यार्जनाचे महत्त्व वगैरे विचार निरक्षर लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अभंग, ओवी, पोवाडा, आरती, मंगलाष्टक, कटाव, लावणी, नाटक, कीर्तन वगैरे बुहसंख्य लोकांना ओळखीच्या असलेल्या वाड्मयप्रकारांचा सत्यशोधकांनी परिणामकारक वापर केला. इंग्रजी साहित्याच्या प्रभावामुळे तेव्हा निबंध हा वाड्मयप्रकार मराठीत रुजू लागला होता. ‘ शेतक-यांचा आसूड ‘ हा एक विस्तृत निबंध वगळता अशा प्रकारचे लेखन जोतीरावांनी केले नाही. कारण ते ज्यांच्यासाठी लिहित होते त्यांना विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या निबंधमालेतील लफ्फेदार, ऐटबाज व संस्कृतप्रचुर निबंधांपेक्षा मराठमोळे काव्य व संवाद अधिक प्रिय होतील हे त्यांना माहीत होते. खेड्यातील शेतक-यांना फसवणारा व निरक्षऱ पाटलाला मुठीत ठेवणारा कलमबहाद्दर ब्राह्मण कुलकर्णी हे एक सत्यशोधकांच्या मा-याचे महत्त्वाचे लक्ष्य होते. ‘ गावगुंड अडमुठा, लुटीतो कुळकर्णी पठ्ठा ‘ या कृष्णाजी पांडुरंग भालेकरांनी लिहिलेल्या लावणीच्या धृपदात किंवा त्यांनीच १८७७ साली लिहिलेल्या बळीबा पाटील नावाच्या ग्रामीण कादंबरीत कुळकर्ण्याविषयीचा शेतक-यांना वाटणारा संताप उफाळून बाहेर येताना दिसतो. सर्व प्रकारच्या अडचणींना तोंड देऊन, पदरमोड करून भालेकरांनी पुण्यात १८७७ साली ‘ दीनबंधू ‘ पत्र सुरू केले तेव्हा त्यांना अवघे १३ वर्गणीदार मिळाले.
जोतीराव फुले हे सत्यशोधक समाजाचे संस्थापक असले तरी ते म्हणतील ती पूर्व दिशा असा प्रकार सत्यशोधक चळवळीत आरंभीच्या काळातही नव्हता. वैयक्तिक मतभेदामुळे, स्वभावभिन्नतेमुळे, हेव्यादाव्यांमुळे, नेतृत्वासाठी चालणा-या स्पर्धेमुळे तसेच वैचारिक मतभेदांमुळे सत्यशोधक चळवळीत वेळोवेळी ताणतणाव निर्माण होत असत. स्त्री पुरुष समतेबद्दलची फुल्यांची मते लोखंडे व भालेकर यांना मान्य नव्हती. ‘ स्त्री पुरुष तुलना ‘ नावाचे पुस्तक बुलढाण्याच्या ताराबाई शिंदे यांनी लिहिले तेव्हा लोखंडे व विशेषतः भालेकर यांनी या पुस्तकावर कडाडून टीका केली. त्यावेळी ताराबाई शिंदे आणि पंडिता रमाबाई या स्त्रियांची कड घेऊ जोतीरावांनी खरमरीत शब्दांत आपल्या अनुयायांची हजेरी घेतली आणि त्यांचे कान उपटले. रानड्यांच्या आधी कितीतरी वर्षे जोतीरावांनी आपल्या पत्नीस सावित्रीबाईस शिकवून त्यांना शिक्षिका म्हणून आपल्या कामात सहभागी करून घेतले होते. घराबाहेर समतेचा आग्रह धरणारे पुरुष घरात समता येऊ देण्यास तयार नसतात. असे पुरुष आपल्या अनुयायांमधे दिसताच जोतीरावांनी ‘ इशारा ‘ , ‘ सत्सार ‘ अंक १ व २ वगैरैंमधून त्यांना धारेवर धरले. रमा, तारेस शिकवायला जाणा-यांनी न्यायमूर्ती रानडे यांच्याप्रमाणे लग्नाच्या भार्येस घरातले घरात आधी विद्वान करावे, असे जोतीरावांनी त्यांना खडसावले.
१८९० साली जोतीराव कालवश झाले. १८९६-९७ ते १९०२ पर्यंतच्या काळात दुष्काळ व प्लेग यांनी थैमान घातले असताना अनेक सत्यशोधक मृत्युमुखी पडले. सावित्रीबाई फुले व नारायणराव लोखंडे यांचे प्लेगने बळी घेतले. व्यंकू बाळोजी कालेवार, जाया काराडी लिंगू, विश्राम रामजी घोले इत्यादि प्रमुख सत्यशोधख १९०२ पूर्वी कालवश झाले. मुंबई आणि पुणे शहरांतील सत्यशोधक समाजाचे काम थंडावल्यासारखे वाटले तरीही ती चळवळ ग्रामीण भागात मूळ धरू लागली. १८९९ सालापासून नारायण बाबाजी पानसरे उर्फ नारो बाबाजी महाधट आणि धर्माजी रामजी डुंबरे पाटील या जुन्नर तालुक्यातील ओतूरच्या दोघा समाजसेवकांनी चळवळीचे लोण खानदेशात, व-हाड मध्यप्रांतात नेण्यास सुरुवात केली.

पश्चात प्रभाव :-
पिंपरी-चिंचवड महापालिका ही फुले आणि आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा करते. जोतीबा फुले यांच्या आयुष्यावर १९५५ साली आचार्य अत्रे यांनी ’महात्मा फुले’ नावाचा चित्रपट काढला होता. त्याला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. जोतीबांच्या जीवनावर ’असूड’ नावाचे एक नाटक डॉ. सोमनाथ मुटकुळे यांनी लिहिले आहे. या नाटकाचे रंगभूमीसाठी दिग्दर्शन बी. पाटील यांनी केले आहे.महात्मा फुले यांच्या निधनानंतर सत्यशोधक चळवळ महाराष्ट्रात रुजवण्यासाठी दिनकरराव जवळकर व केशवराव जेधे यांनी खूप मेहनत घेतली. राजर्षी शाहू महाराजांनी त्यांना समाजप्रबोधनासाठी मदत केली. ब्राम्हणेतर चळवळीसाठी जेधे-जवळकर जोडीने अवघा महाराष्ट्र ढवळून काढला.
जोतीराव फुल्यांच्या गावी म्हणजे खानवडी येथे, दरवर्षी महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन भरते. याशिवाय फुले-आंबेडकर साहित्य संमेलन, फुले-शाहू-आंबेडकर राष्ट्रीय साहित्य संमेलन, सावित्रीबाई फुले साहित्य संमेलन आदी अनेक दलित साहित्य संमेलने फुले यांच्या नावाने भरतात.

साहित्य आणि लेखन:-
‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून ‘दीनबंधू’ हे साप्ताहिक चालविले जात असे. तुकारामाच्या अभंगांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक ‘अखंड’ रचले. त्यांना सामाजिक विषमतेचे जागतिक भान होते. आपला ‘गुलामगिरी’ ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित केला. ‘अस्पृश्यांची कैफियत’ हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशित झाला.

Monday 4 April 2016

आरक्षणाची चोरी - संचिता सातवी



या आरक्षणाची पण आपली एक वेगळीच दैना आहे. कारणआरक्षणाची सुद्धा चोरी होवू लागलीय.

दागिन्यांची चोरी, पैशांची चोरी ऐकली होती. पण..आरक्षणाची चोरी...? होय.आरक्षणाची चोरी.!  ऐकून धक्का बसला ना ..?

"बस झाले आता! आदिवासींना आरक्षण देणे  बंद करा ... !" असे म्हणणारा एक गट आहे तर 'आदिवासींना ५० वर्षापूर्वीचा पुरावा सादर करणे बंधनकारक आहे" असे म्हणणारा कायदा बंदकरा"

असे म्हणणारा दुसरा गट आहे . आणि या गटांच्या लढायित एक तिसराच ज्याचा या कोणत्याही लढायीशी संबंध नाही असा गट खोटी कागदपत्रे सादर करून स्वताला आदिवासी म्हणवून घेवून, आदिवासींच्या नोकऱ्या आणि सवलती लाटून मजा मारतोय .... आणि ज्या तळागाळातल्या, गरजू आदिवासीला हे आरक्षण लागू होतेय, जे या आरक्षणाचे खरे दावेदार आहेत त्यांना मात्र असले काही आरक्षण संविधानाने आपल्याला दिलेय याची पुसटशी कल्पनाही नाही......या गरजूंच्या तोंडाचा घास पळविणे म्हणजेच आरक्षणाची चोरी करणे. आणि अशी चोरी करणारे आणि त्यांना खोटी कागदपत्रे मिळवून देण्यास मदत करणारे अधिकारी हे दोन्हीही सारखेच गुन्हेगार आहेत. खरे तर आदिवासींच्या विकासाचा दर्जा सुधारावा .त्यांची शैक्षणिक ,आर्थिक दृष्ट्या प्रगती व्हावी यासाठी हे आरक्षण आदिवासींना संविधानाने दिले .पण आजतागायत आदिवासींची परिस्थिती होती तशीच आहे .जे काही सुशिक्षित आदिवासी या आरक्षणाचा फायदा घेवून पुढे आले त्यांनी समाजाकडेच पाठ फिरवली. आणि याचाच फायदा बोगस आदिवासींनी घेवून आदिवासींच्या तोंडाचा घास हिसकावून खायला सुरवात केली व आज हे प्रमाण इतके वाढलेय कि आज जवळ जवळ १ लाखापेक्षा जास्त नोकऱ्या ह्या बोगस आदिवासींनी लाटल्यात.इतकेच काय तर आदिवासी चे जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी पैशांचा प्रसंगी ताकदीचा व प्रलोभानाचा वापर करून हि कागद पत्रे मिळवली जाताहेत . ज्या परिस्थितीने पछाडलेल्या ,गरजू आदिवासींना हे आरक्षण लागू होते, त्यावर आज केवळ सधनच नाही तर श्रीमंत व अतिश्रीमंत पांढरपेश्यांनी आज बोगस कागदपत्रे सादर करून आदिवासींच्या नोकऱ्या लाटत आहेत. .केवळ नोकऱ्या व सवलती मिळविण्यासाठी स्वताला आदिवासी म्हणत आहेत .याला चोरी नाही तर काय म्हणायची ...? एरवी ज्या आदिवासी समाजाला अंधश्रद्धाळू ,गरीब, पिछाडलेले ,व्यसनाधीन म्हणवणारे हे लोक नोकऱ्या व सवलतींसाठी मात्र स्वताला आदिवासी(कि बोगस ) म्हणवून घेवू लागलेत .एरवी गरीब आदिवासींकडून गड्यांची कामे करवून घेणारे हे आज स्वताला या समाजाचा हिस्सा म्हणवू लागलेत.काय म्हणावे या वृत्तीला. केवळ फायद्यासाठी स्वताची जात सोडून स्वताला दुसऱ्या जातीचा म्हणवणारा मनुष्य हा किती कृतघ्न व मतलब साधू आहे हे कळते. असा मनुष्य स्वताच्या समाजाशी इमान राखत नाही, तो आपला काय उद्धार करणार....? मग यांना कुणी अधिकार दिला आदिवासी म्हणवून घेवून आमच्या नोकऱ्या पळविण्याचा ...? यापेक्षा प्राणी बरे जे इतर ठिकाणी खायला जास्त मिळत असले तरी मालकाला सोडून जात नाहीत, मालकाशी इमान राखतात. यांना माहित तरी आहे का कि आदिवासी म्हणजे काय, त्यांची संस्कृती ,त्यांची भाषा काय आहे ते...? अरे हो... पण हे कुठे आदिवासींवर पी एच.डी करताहेत, यांना तर फक्त आपल्या नोकऱ्या हव्यात. मग आदिवासी जगो वा मरो ..आपल्याला त्याच्याशी काय करायचेय, नाही का...?' यांना तर हेही ठावूक नाही कि खरा आदिवासी कधीच बेईमानी करीत नाही मग तुम्ही कोण स्वतःला आदिवासी म्हणविणारे ..? आदिवासींच्या मानगुटीवर बसलेले हे नवीन भूत म्हणजे बोगस आदिवासी ! आता हा काय प्रकार आहे ..? बोगस माल, बोगस कागदपत्रे ऐकले होते पण हा बोगस आदिवासी काय प्रकार आहे बुवा ...? मग खरे आदिवासी कोण...? आम्ही जे ५० वर्षापूर्वीपासून आदिवासी असल्याचा पुरावा बाळगणारे कि ते ज्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना घूस चारून आदिवासी असल्याचा खोटा दाखला मिळवलाय ते...? कोण खरे आदिवासी आणि कोण बोगस हे कसे ओळखावे...? कारण हे बोगस लोक नोकऱ्या मिळवण्यासाठी स्वतःला आदिवासी म्हणवून घेताहेत आणि आपण खरे आदिवासी म्हणून नोकऱ्या मिळवलयात पण समाजाकडे तर दोघांनी पण पाठ फिरवली न ...? मग आपण खरे आदिवासी कसे...?

आपण तर खरे आदिवासी ना...! मग आपल्या नोकऱ्या लाटणाऱ्या या बोगस चोरांविरुद्ध आपले रक्त का खवळत नाही ...? का "आपल्याला आरक्षण मिळाले बस झाले ,आता तुम्ही काहीही करा" असा जर विचार करत असाल तर आपल्या मुलाबाळांचा ,लहान भावंडांचा विचार करा.
परंतु असेही नाही कि या बोगस लोकांना घरी बसून चार शिव्या दिल्या कि झाली आपली जबाबदारी पूर्ण!.नाही.कारण आपण ज्या अर्थी आदिवासी म्हणून सवलती घेतल्या त्या अर्थी या समाजाचे ऋण आपण फेडायलाच हवे अन्यथा या आरक्षणाचा लाभ घेण्याचा अधिकार आपल्याला नाही. आज कितीतरी सुशिक्षित आदिवासींनी या सवलतींचा लाभ घेतलाय व स्वतःची प्रगती करून घेतलीय . परंतु जेव्हा प्रश्न येतो समाजाच्या प्रगतीचा तेव्हा मात्र समाजाकडे पाठ फिरवलीय

काहींनी तर स्वतःला आदिवासी म्हणवून घ्यायला पण लाजा वाटू लागल्यात मग बोगस आदिवासी आणि आपण (जे खरे आदिवासी असण्याचा दावा करतात) यांच्यात फरक काय..? काय विरोधाभास आहे आणि हा..कि एकीकडे ज्यांचा काही संबंध नाही आदिवासींशी ते स्वतःला आदिवासी म्हणवून घेताहेत आणि एकीकडे जे आदिवासी आहेत ते स्वतःला आदिवासी म्हणवून घेण्यास नकार देताहेत.पण आरक्षण, सवलती मात्र दोघांनाही हव्यात .खरेच आज प्रश्न पडतोय कि" खरे आदिवासी कोण आणि बोगस कोण ..?' "जे खोटे दाखले मिळवून नोकऱ्या लाटणारे कि, जे खरे असून आरक्षण घेवून गप्प बसणारे,,,!' कारण हे दोघेही समाजाला घातकच नाही का...? नाही म्हणायला समाजाचे ऋण प्रामाणिकपणे फेडणारे आहेत पण ते केवळ हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच .आणि त्यांना हातभार लावणारेही तुरळकच !

आणि विशेष म्हणजे या गोष्टीचे ना आपल्या तरुणांना गांभीर्य वाटतेय ना आपल्या आमदार, खासदारांना! सर्वच्या सर्व मुग गिळून गप्प बसलेत. जर हे असेच चालू राहिले ना तर आज आरक्षणाची चोरी होतेय, पण उद्या आपले अस्तित्वच चोरीला जायला वेळ नाय लागणार.
घरात चोरी होत असताना चोराला "चोरी करू नकोस' म्हणून विनंती करायची कि त्याच्या मुसक्या बांधायच्या , हे आता तुम्हीच ठरवा!

Sunday 3 April 2016

•चलो आझाद मैदान-मुंबई
•आदिवासी महामोर्चा / आंदोलन
•बुधवार,
•दि.6 एप्रिल, 2016.
•बोगस-घूसखोर-जमातचोर आदिवासी
विरोधात
•खऱ्या आदिवासींचा एल्गार...!
जय जय जय आदिवासी..!